ताज्या बातम्या महाराष्ट्र

आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचं ठरलं; सरकारला इशारा

जालना

राज्य सरकारने काल विशेष अधिवेशन घेत मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेतलं. मात्र मनोज जरांगे पाटील सरकारच्या या निर्णयावर नाराज आहेत. आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको, तर ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

आम्हाला सरकारचे आरक्षण मान्य नाही. आता आमच्यापुढे आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील पुढे म्हणाले, जाणून बुजून सरकारने उपोषणाटी आणि आंदोलनाची वेळ आणली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली जात नाही, तोपर्यंत सरकारची सुट्टी नाही. सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, असंही पाटील म्हणाले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात