मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात छगन भुजबळ विरूद्ध मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) विरोध दर्शवला आहे. सभेतही त्यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला आहे.
पुन्हा एक भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे. मात्र यंदा उपरोधिक पद्धतीने त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले छगन भुजबळ
आपण जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत’, ‘जरांगेंनी सरकारला नव्हे तर सरकारनेच जरांगेंना वेठीस धरलंय. मनोज जरांगे यांच्या मागण्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सगळ्यांनाच आरक्षण दिले पाहिजे. एवढेच कशाला मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील. राज्य सरकारने त्यांना घाबरुन वाटाघाटीत वेळ न घालवता तात्काळ मनोज जरांगे सांगतील तसा जीआर काढला पाहिजे.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी न करत बसता थेट मराठा आरक्षणाचा जीआर काढला पाहिजे. एवढेच नव्हे तर मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी जालन्याला जाण्याऐवजी अंतरवाली सराटी येथेच दोन-चार मंत्र्यांचे कायमस्वरुपी बंगले आणि मुख्य सचिवांचे एक कार्यालयही सुरु करावे. जेणेकरुन मनोज जरांगे यांच्या डोक्यातून एखादी अभिनव कल्पना निघाली की, मुख्य सचिव लगेच सही करुन तसा जीआर काढू शकतील