ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘मी बाबर किंवा जिन्नांचा प्रवक्ता नाही, रामाचा आदर मात्र…’ , राम मंदिर वादादरम्यान असदुद्दीन ओवैसी लोकसभेत काय म्हणाले?

नवी दिल्ली

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील अखेरचं अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. या अधिवेशनच्या अखेरच्या टप्प्यात राम मंदिराच्या अभिनंदनाचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत मांडण्यात आला. राम मंदिर निर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतंय.

कुणी दिल्या लोकसभेत बाबरी जिंदाबादच्या घोषणा
एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी या चर्चेवेळी बोलताना लोकसभेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. मोदी सरकार हे केवळ हिंदूंचे सरकार आहे का, असा सवाल त्यांनी लोकसभेत उपस्थित केला. या देशाला कोणताही धर्म नाही, धर्मनिरपेक्ष असा उल्लेख राज्यघटनेत असताना मोदी सरकार काय करत आहे, असा प्रश्न ओवेसींनी मांडलाय. यावेळी त्यांनी बाबरी मशीद जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. आपण बाबर किंवा जिन्नांचे प्रवक्ते नाही, मात्र मोदी सरकार देशाला काय संदेश देऊ पाहतेय, अशी विचारणाही ओवेसींनी या भाषणात केलीय. या देशात एका धर्मानं दुसऱ्या धर्मावर विजय मिळवला, हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. असा आरोपही त्यांनी त्यांच्या भाषणात केला.

रामाचा आदर मात्र मथुरामाचा नाही- ओवेसी
१९९२ साली देशातील मुस्लीमांना धोका देण्यात आल्याची टीकाही त्यांनी भाषणात केली. यावेळी झालेल्या दंगलीनंतर अनेक तरुणांना तुरुंगात टाकण्यात आलंय, ते आता त्यांच्या म्हातारपणापर्यंत तिथंच खितपत पडत राहणार असल्याचंही ओवेसी म्हणालेत. आपल्या मनात रामाबाबत आदर आहे., मात्र महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुरामाबाबत आदर नाही, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. ओवेसी असल्याने आपल्याला केवळ बाबर यांच्याबाबतच विचारणा होते, मात्र कधी आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरु आणि सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतही विचारा, अशी तिरकस टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवंर केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे