महाराष्ट्र ताज्या बातम्या

वाळू माफियांवर आमदार अमोल खताळ यांची थेट धडक!

”प्रशासन झोपलंय का?” – आमदार अमोल खताळ यांचा संतप्त सवाल

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. सामाजिक कार्यक्रमावरून परतत असताना आमदार अमोल खताळ यांनी तनपूरवाडी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत, स्वतः त्या वाहनावर कारवाई केली.

आपले वाहन थांबवत आमदार खताळ यांनी तात्काळ पोलिसांना घटनास्थळी बोलावले आणि वाळूने भरलेली संशयित गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले, “मी आमदार असूनही रस्त्यावर उतरून ही कारवाई करत आहे, मग प्रशासन काय करतंय?”

ते पुढे म्हणाले, “संगमनेर तालुक्यात अवैध वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कोणाच्या आशीर्वादाने हे माफिया इतके बेधडक झाले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. प्रशासनातील काहींची संगनमतानेच हा काळा धंदा फोफावतोय. पण आता हे थांबवले जाईल, हे मी जनतेला शब्द देतो.”

ओव्हरलोड वाहने, शेतांचे नुकसान, आणि रस्त्यांची झीज यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा उल्लेख करून खताळ म्हणाले, “या माफियांमुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, अपघातांची भीती, आणि दिवसेंदिवस वाढणारी दहशत – हे आता खपवून घेतलं जाणार नाही. प्रशासनाने जर वेळेवर पावले उचलली नाहीत, तर मी अशाच प्रकारे पुन्हा मैदानात उतरेन.”

या घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांनी आमदार खताळ यांच्या धाडसी आणि जनतेच्या हितासाठी उचललेल्या पावलाचं भरभरून कौतुक केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर आता लगाम बसेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात