महाराष्ट्र ताज्या बातम्या

ग्रामिण गरोदर माता आणि आदिवासी मातांना समान आहार देण्याची आमदार चित्रा वाघ यांची मागणी

मुंबई : राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर सभागृहात आवाज उठवताना समाधान वाटले, असे भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी म्हटले. कुपोषण थांबले पाहिजे यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असून, आदिवासी व ग्रामीण गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी मिळणाऱ्या आहारात तफावत असू नये, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

राज्यातील आदिवासी भागातील गरोदर आणि स्तनदा मातांसाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवली जाते. यामध्ये त्यांना चौरस आहारासाठी दररोज ४५ रुपये दिले जातात. त्याचवेळी ग्रामीण भागातील गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी केवळ ८ रुपये निधी दिला जातो, ज्यामध्ये ६० ग्रॅम शेंगदाणा लाडू आणि २०० ग्रॅम खिचडी किंवा वरण-भात पुरवले जाते.

आ. चित्रा वाघ यांनी या आहार दरात वाढ करण्याची मागणी केली. आदिवासी आणि ग्रामीण गरोदर मातांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत फारसा फरक नाही, त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या आहारातही तफावत असू नये, असे त्या म्हणाल्या. ग्रामीण गरोदर मातांनाही आदिवासी महिलांसारखा चौरस आहार मिळावा आणि अंगणवाडी सेविकांचा मानधन दर वाढवावा, अशी त्यांनी सभागृहात आग्रही मागणी केली.

या मागणीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून योग्य तो न्याय मिळवून देतील, असा विश्वास आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात