महाराष्ट्र ताज्या बातम्या

संगीतकार वसंत देसाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्वरांजली – २२ डिसेंबरला दादरमध्ये कार्यक्रम

नागपूर – भारतीय संगीतविश्वाला ‘एक सूर, एक ताल’ या अद्वितीय समूहगान संकल्पनेद्वारे समृद्ध करणारे प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री वसंत देसाई यांच्या ४९व्या स्मृतीदिनानिमित्त स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. युवा कला मंच आणि स्वरांगण गीत समूहाच्या वतीने हा कार्यक्रम रविवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतील दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.

सोमनाथ परब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम
संगीतकार व वसंत देसाई यांचे शिष्य सोमनाथ परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गेली चार दशके ‘एक सूर, एक ताल’ संकल्पना जपत, विद्यार्थ्यांना संस्कारशील बनविणाऱ्या परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

चारशे विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग
दादर येथील वसंत देसाई चौक, शिवाजी पार्क येथे होणाऱ्या या स्वरांजली उपक्रमात चारशेहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि युवक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाद्वारे वसंत देसाई यांच्या कालातीत चाली आणि गीतांवर श्रद्धांजली वाहण्यात येईल.

वसंत देसाई यांचा संगीताचा वारसा
‘घन:श्याम सुंदरा’, ‘उठी उठी गोपाळा’, ‘हमको मन की शक्ति देना’, ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ यांसारखी अनेक गीते आजही रसिकांच्या हृदयावर राज्य करतात. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या चालींनी गारुड करणारे वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी मुंबईतील एका दुर्दैवी लिफ्ट अपघातात निधन झाले होते.

पन्नासाव्या स्मृतीदिनाची तयारी सुरू
पुढील वर्षी वसंत देसाई यांचा पन्नासावा स्मृतीदिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने हजारो विद्यार्थी ‘एक सूर, एक ताल’ या संकल्पनेतून त्यांना स्वरांजली अर्पण करणार असल्याची माहिती संगीतकार सोमनाथ परब यांनी दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात