मुंबई – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिम समाजाला ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, भाजपने यावर जोरदार टीका केली आहे. राज्य भाजप प्रवक्ते अजय पाठक यांनी काँग्रेसवर संविधानाच्या अवहेलनेचा आरोप करत हा निर्णय तुष्टीकरणाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना अजय पाठक म्हणाले, “भारतीय संविधानानुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. संविधान सभेने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निर्णयानुसार, धर्माधारित आरक्षण मान्य नाही. मात्र, काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करण्यासाठी संविधानाचे उल्लंघन करत आहे.”
“काँग्रेसचा मुख्य उद्देश हा दलित आणि ओबीसींचे आरक्षण कमी करून मुसलमानांना देण्याचा आहे. हा पक्ष आता फक्त मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने उभा राहिलेला आहे. काँग्रेस बहुसंख्य समाजाचा अनादर करत असून, त्यांच्या हक्कांना धोका निर्माण करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पाठक यांनी काँग्रेसवर सनातन धर्माबाबतही आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप केला. “काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी सनातन धर्माला मलेरिया, एड्स आणि डेंगू म्हणतात आणि सनातन संपवण्याची भाषा करतात. त्यामुळे काँग्रेस कोणत्या दिशेने जात आहे, हे देशातील बहुसंख्य समाजाने लक्षात घ्यायला हवे,” असे ते म्हणाले.
भाजपने काँग्रेसच्या या निर्णयाला संविधानविरोधी आणि देशविघातक ठरवत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “हा देश फोडण्याचा काँग्रेसचा डाव आहे. बहुसंख्य समाजाने आता