महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात ३९४ ‘नमो उद्याने’; प्रत्येकासाठी ₹१ कोटी निधी”

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून एकूण ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. ही उद्याने ‘नमो उद्यान’ या नावाने ओळखली जातील, अशी माहिती राज्यमंत्री Madhuri Misal यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

हा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य Bhaskar Jadhav यांनी उपस्थित केला होता.

राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, या योजनेसाठी लेखाशिर्ष २२१७-१३०१ अंतर्गत अर्थसंकल्पीय निधीतून तरतूद करण्यात आली आहे. नमो उद्याने विकसित करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

उद्याने विकसित झाल्यानंतर विभागीय स्तरावर ‘नमो उद्यान’ स्पर्धा आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रशासकीय विभागातून तीन उद्यानांची निवड करण्यात येईल.

  • प्रथम पारितोषिक : ₹५ कोटी
  • द्वितीय पारितोषिक : ₹३ कोटी
  • तृतीय पारितोषिक : ₹२ कोटी

या स्पर्धेचे निकाल १७ सप्टेंबरपर्यंत जाहीर केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. avanafil generic

    March 5, 2026

    avanafil generic

    avanafil generic

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात