महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात नवीन वाळू धोरण – वाळू माफियांवर कारवाईची घोषणा

मुंबई : राज्यात वाळू माफिया आणि वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच सर्वंकष वाळू धोरण लागू करणार आहे, अशी घोषणा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली. तसेच, गोदावरी खोऱ्यातील वाळू उपशाबाबत सात दिवसांत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी राज्य सरकार नव्या वाळू धोरणाच्या तयारीत असल्याचे सांगितले.

या धोरणानुसार:
• ‘एम सॅन्ड’ (दगडापासून तयार केलेली वाळू) वापरावर भर
• राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वाळू क्रशर उभारणार
• प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १०० क्रशर उभारण्यासाठी शासनाचे अर्थसहाय्य
• वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल आणि पोलिसांना समान अधिकार

सदस्य प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे आणि एकनाथ खडसे यांनी या चर्चेत सहभाग घेतला. यावर मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव येथील वाळू तस्करी प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

‘एम सॅन्ड’च्या वापरामुळे वाळूची उपलब्धता वाढून सध्याच्या पुरवठा-मागणीतील तफावत दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे वाळू माफियांचे वर्चस्व आपोआप कमी होईल. तसेच, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सक्शन पंपाच्या सहाय्याने होणाऱ्या अवैध वाळू उपशाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात