महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : फक्त ३६% खर्च, सव्वा लाख कोटींच्या पुरवणी मागण्या; सरकारने आणखी दोन लाख कोटी काढावेत का? — जयंत पाटील यांचा उपरोध

नागपूर – “अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी फक्त ३६ टक्के खर्च झाला आहे… आणि तरीही आतापर्यंत सव्वा लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या आहेत. मार्च २०२६ पर्यंत आणखी मागण्या होतील. तर मग खर्च भागवण्यासाठी सरकारने आता आणखी दोन लाख कोटी रुपयांचा खर्च काढावा का?” — असा मर्मभेदी टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत महायुती सरकारवर लगावला. विशेष म्हणजे अर्थमंत्री अजित पवार सभागृहात उपस्थित असताना त्यांनी हा उपरोध केला.

पुरवणी मागण्यांवरील चर्चा जयंत पाटील यांनी त्यांच्या विशेष मिश्किल भाषाशैलीत केली — कधी उपरोध, कधी कानउघाडणी, तर कधी चिमटे काढत त्यांनी सरकारला घेरले. सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका करताना ते म्हणाले, “कंत्राटदारांची नव्वद हजार कोटी रुपयांची बिले कशी भागविणार?” “आजपर्यंत किती बिले चुकती केली याची माहिती सरकारने द्यावी.” समृद्धी महामार्गावरील इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टिम (ITS) वर ५०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, पण “अपघात मात्र वाढत आहेत”, असेही त्यांनी अधोरेखित केले.

पाटील म्हणाले, “बांधकाम विभाग अध्यात्मिक स्थळांचा जिर्णोद्धार करणार म्हणजे नेमके काय? मग एमएसआरडीसीचे काम काय?” या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला.

पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईसंदर्भात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी आपल्या भाषणातून असंख्य मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले,  “एकाच विभागात गुंठ्यामागे नुकसानभरपाईत प्रचंड तफावत कशी?”, पूर्वी पीक विम्यासाठी चार निकष होते; आता तीन काढून टाकले, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

“फोनपेवर शेतकऱ्यांकडून लाच मागितली जाते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी सभागृहात केला.

जयंत पाटील यांच्या उपरोधिक पण ठळक आरोपांनी सरकारचे आर्थिक व्यवस्थापन, कंत्राटदार बिले, समृद्धी महामार्गाचे खर्च–परिणाम, अध्यात्मिक स्थळांचे कामकाज आणि पीक विमा योजना अशा सर्वच विषयांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात