महाराष्ट्र ताज्या बातम्या

नुसते खोके आणि जाहिराती, कधी होणार पद भरती?

X: @NalavadeAnant

विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने

नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शुक्रवारी सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “नुसत्या घोषणा आणि जाहिराती,  कधी होणार पद भरती” “सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. 

याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारविरोधात ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले, भरतीची  घोषणा, काय दिवे लावले. उच्चशिक्षित तरुणांची थट्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बेरोजगारांना पकोडे तळा म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. 

“एक दिवा खोक्यानी दुसरा दिवा धोक्यानी”, नुसत्या घोषणा आणि जाहिराती, कधी होणार पद भरती”, सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” का होतेय पेपरफुटी,  क्या यही है मोदी की गॅरंटी?” सरकारनं दिला युवकांना धोका,  म्हणून काढलाय भरतीचा ठेका” अशा विविध घोषणा लिहिलेले काळे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.

Also Read: मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ही डीजे बंदी करावी – सुनील माने 

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात