महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sanjay Nirupam on UBT Sena: बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेला ‘उबाठा’ पक्षच कृत्रिम झाला आहे – शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची घणाघाती टीका

मुंबई : “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून सत्तेसाठी हिंदुत्वाचा त्याग करणारा उबाठा गटच आज कृत्रिम बनला आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

“बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून दाखवले गेले, मात्र खरे पाहता खुद्द उबाठा गटच आर्टिफिशियल झाला आहे. कारण सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व दोन्हीही सोडून दिले,” असा आरोप निरुपम यांनी केला.

“बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले होते की, ‘काँग्रेससोबत कधीच जाऊ नका. गेलात तर शिवसेनेचे दुकान बंद करा.’ पण उबाठा गटाने केवळ खुर्चीसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधले,” असा टोला त्यांनी लगावला.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर बोलताना निरुपम म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर उबाठा मौन का बाळगतो? ममता बॅनर्जी यांचा निषेध का करत नाहीत? कारण उबाठा त्यांच्या सोबत आहे.”

“वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र काही जण कोर्टाने मनाई केली आहे, असा चुकीचा प्रचार करत आहेत. वक्फ बोर्ड ही बिगर धार्मिक संस्था आहे, तर मंदिर ट्रस्ट पूर्णपणे धार्मिक संस्था असते. त्यामुळे दोघांची तुलना होऊ शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख करत निरुपम म्हणाले, “या धोरणामुळे विद्यार्थी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांत पारंगत होतील. इंग्रजीच्या सक्तीवर कोणीही आक्षेप घेत नाही, पण हिंदीवर आक्षेप घेतात, हे केवळ राजकीय ढोंग आहे.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात