ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सोम्या-गोम्या’वरुन अजित दादा आणि संजय राऊतांमध्ये जुंपली!

मुंबई

संजय राऊत यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत, आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर अजित पवारांनीही दिलेल्या उत्तरानंतर दोघांमध्ये जुंपली आहे.

अजित पवारांना याबाबत विचारल्यावर, सोम्या-गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती. यानंतर संजय राऊतांनीही यावर जहरी टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?
सोम्या-गोम्या कोण हे २०२४ ला कळेलच. त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली त्यांनी आमच्यावर बोलूच नये असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार टीकेला प्रत्युत्तर दिले.

याशिवाय पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यावर दिल्लीतून आक्रमण होत आहे. राज्यातील उद्योग रोजगार पळवले जात आहेत, मात्र विद्यमान सरकारमधील हौशे, नौशे, गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त महत्त्व दिलं जात आहे. मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास का हिरावून घेतला जात आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असं म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात