ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आज स्वत:ला योद्धा म्हणणारे त्यावेळी कसे पळून गेले’, अयोध्या आंदोलनावर संजय राऊतांचा घणाघात

मुंबई

सध्या देशभरात अयोध्या आंदोलनावरुन श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. एकीकडे अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात अयोध्या आंदोलनाचं श्रेय कुणाचं, यावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी समाज माध्यमांशी बोलताना भाजपवर घणाघात केला.

काय म्हणाले संजय राऊत…
शिवसेनेच्या उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, अयोध्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं योगदान काय असा सवाल उपस्थित करणाऱ्यांनी त्यांचं योगदान काय आधी याचं उत्तर द्यावं.. आज स्वत: ला योद्धा मानणारे लोक ज्यावेळी अयोध्येत आंदोलन सुरू होतं, तेव्हा कसे पळून गेले होते. त्यावेळी भाजपने या आंदोलनामागे शिवसैनिक असल्याचा दावा केला होता आणि बाळासाहेब ठाकरेंनी अयोध्या आंदोलनाचं समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यावेळी पळून गेलेल्यांनी आम्हाला सवाल विचारू नये.

यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की, ‘जर शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असं भाजपचं म्हणणं असेल तर शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी काम केलं याचा मला अभिमान आहे.’ मात्र यावेळी भाजपचे मोठ मोठे नेते कुठे गायब झाले होते, असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात