महाराष्ट्र ताज्या बातम्या

साठवण सुवर्ण क्षणांची! छायाचित्र स्पर्धा २०२५: मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सदस्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रांचा सहभाग असलेले वार्षिक कॅलेंडर प्रकाशित केले जाणार आहे.
“आपल्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणांची सुवर्ण साठवण करण्याची ही नामी संधी आहे,” असे संघाने कळवले.

स्पर्धेत संघाचे सर्व सदस्य सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी कार्यकारिणी सदस्य अंशुमन पोयरेकर (मो. ९८९२०९७९६५) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेच्या अटी व मार्गदर्शक तत्त्वे
1. स्पर्धा फक्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी खुली आहे.
2. कॅलेंडरची थीम – ‘जिगरबाज मुंबई’. एमएमआरडीए परिसरातील छायाचित्रे अपेक्षित; रक्तरंजित वा त्रासदायक फोटो टाळावेत.
3. प्रत्येक सदस्याने कमाल १२ छायाचित्रे सादर करावीत. अधिक छायाचित्रे पाठविल्यास प्रवेशिका अपात्र ठरेल.
4. छायाचित्र JPEG फॉरमॅटमध्ये, किमान ३०० DPI, ८०० KB ते २ MB आकारात आणि 1920×1080 पिक्सल साईजमध्ये असावे.
5. प्रत्येक फोटोसोबत कॅप्शन, सदस्याचा संक्षिप्त बायोडेटा (५० शब्द) व पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
6. छायाचित्रे केवळ photo.mmps@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत.
7. प्रवेशाची अंतिम तारीख: ७ ऑक्टोबर २०२५. अंतिम मुदतीनंतर आलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
8. फोटो कालावधी: १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यानचे असणे आवश्यक.
9. फोटोवर सदस्याची ओळख दाखवणारा कोणताही उल्लेख नसावा. कॉपीराईटची जबाबदारी स्पर्धकाची राहील.
10. परीक्षक मंडळ ३ जणांचे असेल.
11. १२ विजेत्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व प्रत्येकी ₹१०,००० चे पारितोषिक दिले जाईल. विजेते फोटो कॅलेंडरमधील १२ महिन्यांसाठी वापरले जातील.
12. स्पर्धेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर केला जाईल.

संघाने स्पष्ट केले आहे की, अपुरी माहिती असलेली वा उशिरा आलेली नोंदणी बाद करण्याचा पूर्ण अधिकार आयोजकांकडे राहील. तसेच विजेत्या छायाचित्रांचे कॅलेंडर प्रकाशन म्हणजेच संबंधित छायाचित्रांच्या कॉपीराईटला दिलेली मान्यता असेल.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात