महाराष्ट्र ताज्या बातम्या

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या शालिनी लक्ष्मण पाटील यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या शालिनी लक्ष्मण पाटील यांचे आज (12 एप्रिल 2025) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. सर्वजण त्यांना प्रेमाने ‘नानी’ या नावाने ओळखत. त्या सिनिअर ॲडव्होकेट राजीव पाटील यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता, दादर येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीद्वारे त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.

अंत्यसंस्कारावेळी राजीव पाटील, त्यांच्या पत्नी सुरेखा दळवी, सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार कपिल पाटील, सेवा दलाचे माजी अध्यक्ष नितीन वैद्य, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर व नातेवाईक उपस्थित होते.

शालिनी पाटील यांचे राष्ट्र सेवा दल, अपना बाजार, युक्रांद, क्षात्रैक्य परिषद, साने गुरूजी विद्यालय अशा अनेक संस्थांमध्ये कार्य सक्रिय राहिले. समाजवादी चळवळीत त्यांच्यासह त्यांच्या दिवंगत पती आणि कुटुंबियांचे योगदान लक्षणीय राहिले आहे.

त्यांच्या पश्चात सुपुत्र ॲड. राजीव पाटील, दोन कन्या, नातवंडे आणि सून सुरेखा दळवी असा परिवार आहे.

माजी आमदार कपिल पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, “काका ॲड. लक्ष्मण पाटील आणि काकी शालिनी पाटील यांनी मला समाजवादी विचारधारा आणि सेवा दलाचा वारसा दिला. नानी सेवा दल शिबिरांची अनेक वर्षे मुख्य प्रशिक्षक होत्या. नाना मला शिबिरात घेऊन गेले आणि नानीच माझी प्रशिक्षक होत्या. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.”

प्रार्थना सभा – रविवार, 20 एप्रिल 2025
शालिनी पाटील यांनी शिक्षक म्हणून कार्य केलेल्या साने गुरुजी विद्यालय, शिवाजी पार्क, दादर येथे रविवार, 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात