महाराष्ट्र ताज्या बातम्या

कार्यकर्त्यांप्रती संवेदनशीलता – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हळव्या क्षणांचा अनुभव

ठाणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय रणनीतीसाठी ओळखले जात असले तरी कार्यकर्त्यांप्रती त्यांची असलेली आत्मीयता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. होळी पौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या होलिका दहन कार्यक्रमात शिंदे यांनी दिवंगत शिवसैनिक बबन मोरे यांची आठवण काढत भावूक होत श्रद्धांजली अर्पण केली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शिंदे कुटुंबीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने शिंदे यांच्या नेतृत्वगुणांवर आणि कार्यावर स्तुतीसुमने उधळण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी शिंदे यांनी सूत्रसंचालकाला थांबवत स्व. बबन मोरे यांचा उल्लेख करण्याची विनंती केली.

“आजच्या होळीच्या सणाला दु:खाची किनार आहे. दरवर्षी हा माईक बबनच्या हातात असायचा. त्याला श्रद्धांजली वाहा,” असे म्हणताच शिंदे भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. मात्र, समोर असलेल्या कॅमेऱ्यांचा विचार करत त्यांनी स्वतःला सावरले आणि जवळच्या सहकाऱ्यांशी बोलत मन स्थिर ठेवले.

कोविडच्या काळात स्व. बबन मोरे गंभीर अवस्थेत असताना त्यांना व्हेंटिलेटर बेड मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी थेट हस्तक्षेप केला होता. “बबन, तुला काही होणार नाही. काळजी करू नकोस,” अशा शब्दांत त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मोरे यांना धीर दिला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उपचारांपेक्षा या शब्दांनीच बबन मोरे यांना जगण्याची नवी उमेद दिली होती.

शिंदे यांनी कोविड काळात अनेक कार्यकर्त्यांना वैयक्तिक लक्ष देत मदत केली होती. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळेच ते शिवसैनिकांसाठी केवळ नेता नसून एक “माऊली” बनले आहेत. त्यांच्या या वागणुकीमुळे ते केवळ राजकीय नेता नाहीत तर सहकाऱ्यांसाठी कुटुंबप्रमुख असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

(शब्दांकन: मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष)

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात