ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा, नाही केल्यास दोन दिवस जेवू नका’; मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदारांचा अजब सल्ला

मुंबई

‘तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा… नाही केल्यास दोन दिवस जेवण करू नका’, असा दम विद्यार्थ्यांना देताना शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदार संतोष बांगर यांचा व्हिडीओ समोर आला आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना दम भरणे बांगरांना महागात पडले आहे. विरोधी नेत्यांकडून बांगरांच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे.

‘निवडणुकीत किंवा निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात, प्रचारात लहान मुलांचा वापर करू नका हे निवडणूक आयोगाचे आदेश असताना सुद्धा सत्ताधारी पक्षातील आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आमदार हे सगळं करतोय ते सुद्धा शाळेत जाऊन. आयोगाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या संतोष बांगरवर निवडणूक आयोग कारवाई करेल का? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील शिक्षण मंत्री स्वतःच्या पक्षातील आमदार शाळेत जाऊन हे सगळे प्रकार करत असताना झोपले आहेत का ? हे योग्य आहे का? असा प्रश्न शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर उपस्थित केला आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी संतोष बांगरांचा शाळेतील मुलांना दम भरतानाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. याशिवाय निवडणूक आयोगाकडून यावर कारवाईची मागणीही केली आहे.

वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमी चर्चेत राहणारे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या नव्या वक्तव्यामुळे ते वादात अडकले आहेत. आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत विधान केलं होतं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन, असं ते म्हणाले होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात