महाराष्ट्र ताज्या बातम्या

“एसटी पास थेट शाळेत” योजनेला उस्फूर्त प्रतिसाद; ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई –राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” या अभिनव योजनेला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, केवळ १५ दिवसांत ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

ते म्हणाले, “शाळा-महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले असून, या कालावधीत १ लाख ६१ हजार २०० विद्यार्थ्यांना एसटी कर्मचारी त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करत आहेत.”

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनींना मोफत एसटी पास दिले गेले आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना एसटी पाससाठी आगारात जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता शाळा/महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेत पास वितरित केले जात आहेत.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता शालेय एसटी फेऱ्या कोणत्याही कारणाने रद्द होऊ नयेत, असे स्पष्ट निर्देशही सरनाईक यांनी दिले. आदिवासी भागात अनेक ठिकाणी एकमेव बसफेरीवर विद्यार्थी अवलंबून असतात. त्यामुळे आगारप्रमुखांनी अशा फेऱ्या नियमित सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

१६ जूनपासून एसटी प्रशासनाने “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्व शाळा आणि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास आगाऊ सूचना दिल्या गेल्या होत्या, यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा आला नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात