महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार मदतीवर लवकर निर्णय: राज्यमंत्री कदम

मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर उचित निर्णय घेतला जाईल, असे Yogesh Kadam यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य Sudhir Mungantiwar यांनी पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्द्यावर विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे लक्षवेधी सूचना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल : देवेंद्र फडणवीस मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार दावोस: स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

River Rejuvenation: महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल; देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचा प्रस्ताव – मंत्री पंकजा मुंडे यांचे सादरीकरण

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पुढाकार घेतला असून, यासाठी ‘राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडण्यात आली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या संदर्भातील देशातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महसूल खाते निवडणुकीत व्यस्त; रेती माफियांनी सावित्री नदीत दिवसाढवळ्या वाळू केली फस्त!

महाड: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत महसूल प्रशासन पूर्णपणे व्यस्त असतानाच या संधीचा गैरफायदा घेत रेती माफियांनी सावित्री नदीच्या खाडीपात्रातून दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केल्याचे उघड झाले आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केभुर्ली परिसरात, ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल रिद्धेशजवळ सावित्री खाडीपात्रात पोकलेन मशीनच्या सहाय्याने सर्रास वाळू उपसा सुरू असून, ही वाळू थेट डंपरमध्ये भरून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या लेख

मराठीचा अभिमान; मात्र भाषीय राजकारण अमान्य

राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असली, तरी सध्या सर्वांचे लक्ष मुख्यतः मुंबई महापालिका निवडणुकीकडे केंद्रित झाले आहे. हे लक्ष वेधून घेण्यामागे कारणे स्पष्ट आहेत. सुमारे ७२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, देशाची आर्थिक राजधानी, आशियातील अनेक छोट्या देशांपेक्षा मोठे प्रशासन, आणि राजकीय-सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई — या सगळ्यांमुळे मुंबई महापालिका निवडणूक केवळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan :साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातो; मराठी शाळा बंद करू नका – संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात पानिपतकार विश्वास पाटील यांनी मराठी भाषा, शिक्षण आणि संस्कृतीबाबत कळकळीची भूमिका मांडली. “साहित्य–संस्कृतीचा पूल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असतो. कर्नाटकात एखाद्या शाळेत एकच विद्यार्थी असला तरी कन्नड शाळा सुरू राहते; महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव; अध्यक्ष कोपऱ्यात, राजकारणी केंद्रस्थानी नकोत – अनुराधा पाटील

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेले ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव असतो. साहित्य संमेलने होणे अत्यावश्यक आहे; मात्र या संमेलनांमध्ये संमेलनाध्यक्षांना सन्मान मिळालाच पाहिजे. राजकीय व्यक्तींना अनाठायी मान देऊन संमेलनाध्यक्षांना कोपऱ्यात बसवणे अजिबात योग्य नाही, असे सडेतोड मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या देवत्वाला जोडणारा महामार्ग: “श्रद्धा आणि विकासाची नवी वाट”

X: @vivekbhavaar महाराष्ट्रातील विकास आणि सांस्कृतिक ओळख यांचा संगम जिथे होतो, अशा काही प्रकल्पांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव वेगळ्या नजरेने पाहण्यासारखा आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित झाले, तर काहींना तीव्र विरोधही झाला. मात्र प्रत्येक सरकारी प्रकल्पाचा अर्थ केवळ वाद, शंका किंवा भ्रष्टाचार असा नसतो—काहीवेळा सरकार योग्य दिशेने पावले उचलते आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा – राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी येणाऱ्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्य सरकारला दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात ज्या पद्धतीने समिती स्थापन केली जाते, त्याच धर्तीवर ही समिती स्थापन करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश […]