ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘हाताचा मटनाचा वास गेला असेल…’ म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्ता शिल्पा बोडखे यांचा राजीनामा

मुंबई उद्धव ठाकरे गटाच्या विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता म्हणून काम पाहणाऱ्या शिल्पा बोडखे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत कलहाचं कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआमधील जागा वाटप कधी? रमेश चेन्नीथलांनी सांगितली नेमकी तारीख!

मुंबई उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा यांच्यात लोकसभा जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता इतर राज्यांमध्ये इंडिया आघाडीचा गुंता सुटणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जिवलग मित्राच्या आरोपानंतर काय म्हणाले जरांगे पाटील?

जालना किर्तनकार आणि जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे हेकेखोर आहे आणि गुप्त बैठक घेत असल्याचा आरोप त्यांनी जरांगे पाटलांवर केला. यावर जरांगेंनी आपली भूमिका मांडली. अजय बारस्कर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. बारस्करने पैसे घेतल्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महानंद आता गुजरातला विकले आहे, जय हो, महानंद की’; जितेंद्र आव्हाडांचं सरकारवर टीकास्त्र

मुंबई महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार यापुढे गुजरातहून चालवला जाणार असल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारला एक डेअरी चालवता येत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संजय राऊतांनंतर जितेंद्र आव्हाडांनी सरकारच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करीत सरकारला सवाल उपस्थित केला आहे. महानंद आता गुजरातला विकले आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन तरुणांना उद्ध्वस्त करण्याचे महायुती सरकारचे पाप’ – नाना पटोले

मुंबई पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त, ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद? विरोधकांचा सवाल

पुणे पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी तीन दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन ड्रग) जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि दिल्ली येथे अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून संताप व्यक्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगे हेकेखोर, रोज पलटी मारतो, अनेक गुप्त बैठका घेतो’; अजय महाराज बारस्करांचे धक्कादायक आरोप

मुंबई काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा शिव्या देत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर अनेकांनी जरांगे पाटलांच्या विधानांवर आक्षेप नोंदवला होता. आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईतील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्करांनी जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगे अनेकदा गुप्त बैठका घेतो. यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई ‘केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे’, अशी खरमरीत टीका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचं ठरलं; सरकारला इशारा

जालना राज्य सरकारने काल विशेष अधिवेशन घेत मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेतलं. मात्र मनोज जरांगे पाटील सरकारच्या या निर्णयावर नाराज आहेत. आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको, तर ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. आम्हाला सरकारचे आरक्षण मान्य नाही. आता आमच्यापुढे आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही, असा इशारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सख्ख्या पुतण्याने सोडली अजित पवारांची साथ, युगेंद्र पवार शरद पवार गटात!

मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा असलेल्या पवार घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय आहे. आता पवार घराण्याचा आणखी एक वारसदार राजकारणात येत आहे. मात्र त्याने सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या गटात जाण्याऐवजी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांचा सुपूत्र युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्यापेक्षा शरद पवार […]