ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम, तुपकर-गोयल-फडणवीसांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकरांची मुंबईत बैठक झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच ही बैठक संपली असून रात्री साठेआठ ते दहा या दीडतासाच्या जम्बो बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्न केंद्राकडे मांडतांना तुपकरांना उपमुख्यमंत्री फडणवीसांची खंबीर साथ दिली. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली […]

राष्ट्रीय

TMC नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द, लोकसभेत ठराव मंजूर

नवी दिल्ली कॅश फॉर क्वेरी प्रकरणात ममत बॅनर्जींच्या टीएमसी पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra Expelled from Parliament) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या संबंधात लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला. त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. सुरुवातीला या कारवाईला सभागृहातून विरोध केला जात होता. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव रुग्णालयात दाखल, घरातच कोसळले

हैद्राबादभारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. कालच रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज चंद्रशेखर राव राहत्या घरात खाली कोसळले, यानंतर त्यांच्या पायाला आणि पाठीला जखम झाली आहे. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर हैद्रराबाद येथील राहण्यात […]

मुंबई महाराष्ट्र

इक्बाल मिर्ची देशभक्त आहे का? मलिकांना जो न्याय तो पटेलांना का नाही? काँग्रेस नेत्याचा घणाघात

नागपूरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अजित पवारांना नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशावर विरोध व्यक्त केल्यानंतर आज स्वत: नवाब मलिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काँग्रेस नेत्याच्या एका ट्विटमुळे भाजप कोंडीत पकडला जाण्याची शक्यता आहे. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी जवळीक असलेला आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मिर्ची कुटुंबीयांशी (Iqbal Mirchi) प्रॉपर्टीचा व्यवहार केल्याचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant नागपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी

X: @therajkaran नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधान सभेत आज राज्यातील अवकाळी  पाऊस, दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांची दुरावस्था हा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, संपूर्ण कर्जमाफी करा, (LoP Vijay Wadettiwar demands complete loan waiver for farmers) अशी मागणी आक्रमकपणे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘राजकारण’ने 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब, मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवारांचं नेतृत्व मान्य

मुंबई हिवाळी अधिवेशनाच्याआजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य नवाब मलिक (NCP MLA Nawab Malik) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यापूर्वी ते अजित पवार गटाच्या (Ajit Pawar faction of NCP) कार्यालयातही गेले होते. याशिवाय अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत त्यांच्या कार्यालयात नवाब मलिकांनी (Malik’s support to Ajit Pawar’s group) चर्चा केल्याचं वृत्त आज सकाळी […]

राष्ट्रीय

रेवंथ रेड्डींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तब्बल 1 लाख जणांची उपस्थिती

तेलंगणा काँग्रेसचे अनुमुला रेवंथ रेड्डी यांनी आज तेलंगणात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रेवंथ रेड्डींसह 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 56 वर्षांचे रेवंथ रेड्डी यांच्या शपथ विधीचा (Revanth Reddy took oath as Chief Minister of Telangana) कार्यक्रम लाल बहादुर शास्त्री स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आला होता. शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, […]

महाराष्ट्र

Big News : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत चौकशी?

मुंबई दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे एसआयटी पथक अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. दिशा सालियन प्रकरणी काही आमदार ठाकरेंकडे चौकशीची मागणी करत होते. नागपूरच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियनच्या […]