महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोथरुडमधील वाहतूक कोंडीसाठी ठोस पावले उचला!

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

मुंबई : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज असून, त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कोथरुड मतदारसंघातील वाहतूक सुधारण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी केली.

‘मिशन १५’ अंतर्गत कोथरुडसाठी ३२५ कोटींची मागणी

पुणे शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. पुणे महापालिकेच्या ‘मिशन १५’ प्रकल्पांतर्गत ३३ पैकी १५ प्रमुख रस्त्यांचा विकास हाती घेण्यात आला असून, यासाठी एकूण ८७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
त्यातील कोथरुडसाठी ३२५ कोटी रुपयांची गरज असून, राज्य सरकारने यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

अजित पवारांची सकारात्मक भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या रस्ते विकासासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. तसेच, राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

विकासकामांना गती देणार – चंद्रकांत पाटील

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती दिली जाईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

“पुणेकरांसाठी दर्जेदार वाहतूक व्यवस्था” – चंद्रकांत पाटील

“पुणेकरांना उत्तम दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. येत्या काळात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या सर्व प्रकल्पांना गती दिली जाईल,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात