महाराष्ट्र ताज्या बातम्या

एका नळाचा खर्च ३० हजारांवरून १.३७ लाखांपर्यंत वाढला, अर्थमंत्रालयाने मागितले स्पष्टीकरण : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाने पिण्याचे पाणी देण्याचे जलजीवन मिशन जाहीर केले. मात्र २०२५ उजाडूनही महाराष्ट्रातील नागरिक पाण्यासाठी तहानलेले आहेत, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या योजनेतील भ्रष्टाचारावर तीव्र हल्ला चढवला.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, “जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोदी सरकारने गाजावाजा केला, पण त्याची अंमलबजावणी ही भ्रष्टाचाराने ग्रासलेली आहे. एका नळाची किंमत ३० हजारांवरून १ लाख ३७ हजारांवर कशी गेली, याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्रालयाने मागवले आहे. या योजनेतून फक्त अधिकारी आणि कंत्राटदारांचेच भाग्य फळले.”

ते पुढे म्हणाले, “यवतमाळमध्ये पाणी आणताना एका मुलीचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये महिलांना पाण्यासाठी विहिरीत उतरावे लागते. केंद्र सरकारने आता योजनेच्या निधीत ४७ टक्के कपात केली आहे. त्यामुळे महिलांची वणवण पुढील अनेक वर्षे सुरू राहणार आहे.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात