महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईत धावणार देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी – मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई – मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता लवकरच संपणार असून, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत सुरू होणार आहे. स्वीडनची कॅंडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार असून, ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांना दिल्या.

आज मंत्रालयात मंत्री राणे आणि महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांच्यात ई-वॉटर टॅक्सी प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी ओस्टबर्ग यांचे सल्लागार सलोनी झव्हेरी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे यांनी सांगितले की, मुंबईतील प्रचंड वाढलेल्या वाहतूक ताणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गांवर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

स्वीडनच्या कॅंडेला कंपनीसोबत झालेल्या करारानुसार, त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि वॉटर टॅक्सीच्या परवडणाऱ्या भाडेदरांवर भर द्यावा, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. तसेच, कंपनीला आवश्यक असलेल्या परवान्यांसाठी राज्य सरकार त्वरित निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी महाराष्ट्रातील बंदरांच्या विकासात स्वीडनला रस असल्याचे सांगितले. यावर मंत्री राणे यांनी मुंबईतील ससून डॉकचे मॉडेल पोर्ट म्हणून विकसित करण्याची सूचना केली. स्वीडनच्या कंपन्यांनी राज्य सरकारला पोर्ट विकासासाठी प्रस्ताव सादर करावा, तसेच वाहतुकीसाठी योग्य स्थळांची पाहणी करून देशातील आघाडीचे मॉडेल पोर्ट उभारावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री राणे यांनी दिले. स्वीडनच्या प्रतिनिधींनीही पोर्टच्या विकास, स्वच्छता, सोयीसुविधा आणि गुंतवणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात