महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांवर त्रयस्थ चौकशी : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

मुंबई: वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत इन-कॅमेरा चौकशी करण्यात येईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेत आश्वासन दिले. त्यांनी महामार्गाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल, असेही सांगितले.

भास्कर जाधव यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. ते म्हणाले की, दहा वर्षांपासून हे काम रखडले आहे, ज्यामुळे अनेक अपघात झाले आहेत आणि कोकणवासीयांमध्ये शासनाविषयी नाराजी आहे. त्यांनी महामार्गाच्या पूर्णतेसाठी ठोस कार्यवाहीची मागणी केली. 

प्रशांत बंब यांनी महामार्गाच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचा आरोप करून मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

उत्तरादाखल, मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, परशुराम घाटातील ठिसूळ मातीमुळे संरक्षक भिंती कोसळतात, परंतु आता डिझाईन बदलण्यात आले आहे. चिपळूण पुल कोसळल्याप्रकरणी ठेकेदाराला 50 लाख, तर डिझाईन तयार करणाऱ्याला 20 लाख दंड ठोठावण्यात आला आहे. महामार्गाच्या कामावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गाच्या पूर्णतेसाठी विविध तारखा दिल्या गेल्या आहेत. काही अहवालांनुसार, महामार्गाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, तर इतरांनुसार 2026 च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

महामार्ग पूर्ण झाल्यानंतर, मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ सध्याच्या 12 तासांवरून 6 तासांपर्यंत कमी होईल, असेही अहवालांमध्ये नमूद केले आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात