महाराष्ट्र ताज्या बातम्या

रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर: परिवहनमंत्री सरनाईक यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मद्य आणि अमली पदार्थ सेवन करून वाहन चालवणाऱ्यांची पडताळणी करण्याचा विचार केला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

काशिनाथ दाते यांनी ‘राज्यातील रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ’ याविषयी प्रश्न विचारला होता. उत्तर देताना सरनाईक म्हणाले की, गतवर्षी ३६,०८४ अपघात झाले, ज्यामध्ये १५,३३५ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण देशाच्या तुलनेत ९ टक्के आहे.

सरनाईक यांनी पुढे सांगितले की, राज्यातील ९ राष्ट्रीय महामार्ग आणि सुमारे २१,४०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांवर अपघात प्रवण क्षेत्रांवर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारण्याचे प्रस्तावित आहे. वाहन चालवण्याचा परवाना देताना ३८ ऑटोमेटिक टेस्ट घेतल्या जातात, ज्यामध्ये ७० टक्के परीक्षार्थी नापास होतात.

अपघात प्रवण ठिकाणांची पडताळणी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभागांकडून संयुक्तपणे करण्याचा विचार केला जात आहे. तसेच, अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना १० लाख रुपये देण्यात येतात, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.

या चर्चेत योगेश सागर, आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, गोपीनाथ पडळकर या सदस्यांनी सहभाग घेतला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात