महाराष्ट्र ताज्या बातम्या

विजुभाऊ, आता बस्स्स करा!

नागपूरचे आमदार संदीप जोशी व स्थानिक कलाकारांचा वडेट्टीवारांना इशारा

मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून मंगेशकर कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांमुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या वकुबाला न शोभणाऱ्या वक्तव्यांचा निषेध करत विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी, ज्येष्ठ गायक अमित खोब्रागडे, तबलावादक सचिन ढोमणे आणि कलासाधक प्रफुल्ल माटेगांवकर यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे — आरोपांना लोकांसमोर उत्तर द्या, अन्यथा माफी मागा!

या कलाकारांनी जाहीर पत्रकाद्वारे म्हटलं आहे की, वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबीयांवर आरोप हा केवळ खालच्या पातळीचा नाही, तर देशातील कला-प्रेमी जनतेच्या भावनांवर घाला आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर या सर्वांनी देशासाठी, समाजासाठी जे योगदान दिलं आहे, त्याच्या तोडीचा इतिहास वडेट्टीवारांच्या कुटुंबात असल्यास त्यांनी तो उघड करावा, असं आव्हान जोशी व कलाकारांनी दिलं.

मंगेशकरांचं योगदान :
• 1962, 1965 च्या युद्धात निधी उभारून शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत
• गोवा व दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात योगदान
• 1983 मध्ये क्रिकेट संघासाठी निधी संकलन
• पुलवामा हल्ल्यानंतर एक कोटी रुपयांचं दान
• कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला 25 लाखांचं योगदान

जळजळीत प्रश्नही विचारले गेले :
• ‘ए मेरे वतन के लोगो’ ऐकून नेहरूंच्या डोळ्यांत पाणी आलं होतं, तो इतिहास खोटा आहे का?
• रुग्णालयाच्या जागेवरून कोणत्या सरकारने निर्णय घेतला होता?
• ट्रस्टची रचना काय आहे?
• वडेट्टीवारांनी स्वतःच्या कुटुंबाकडून किती देणग्या दिल्या आहेत?

जोशींचा सवाल :
“मंगेशकर कुटुंबाला लुटारू म्हणणं म्हणजे राष्ट्रभक्तीची विटंबना आहे. वडेट्टीवारांनी ही टीका थांबवावी, अन्यथा जनतेसमोर माफी मागावी.”

वडेट्टीवारांच्या आरोपांमागे पक्षात स्थान टिकवण्याची धडपड आहे, असा थेट आरोप करत, “इतरांकडे बोट दाखवताना स्वतःकडे पाहावं,” असा सज्जड दम नागपूरच्या कलाकारांनी आणि आमदार संदीप जोशी यांनी भरसभेत दिला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात