महाराष्ट्र ताज्या बातम्या

सेनेचा गड कायम राखू : विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनिल राऊत यांचे विधान

मुंबई : व्यंगचित्रांवरील लिखाण वाचत असताना महाराष्ट्रातील तत्कालीन स्थितीची कल्पना येते. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना एकच मुख्यमंत्री होते. या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठी गुजरात राज्याने प्रयत्न केले. ते प्रयत्न हाणून पाडण्याचे प्रयत्न या व्यंगचित्रातून दिसत आहेत. शिवसेना आजही लोकांशी जोडली असल्याचा संदेश लोकांमधून गेला पाहिजे. दत्ता दळवी गेले, भंगार गेला. त्याच्या जाण्याने फरक पडत नाहीत. जो पर्यंत बाळासाहेबांवर आणि उद्धवजीवर विश्वास ठेवणारी खालची फळी अत्यंत मजबूतपणे काम करत आहे, तो पर्यंत काही फरक पडत नाही. गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सर्व बाजूंनी हरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही २० आमदार निवडून आले. शिवसेना संपली नसून तसा प्रयत्न मात्र करण्यात आला. यापुढेही निष्ठेने काम करू, सेनेचा गड राखू असा विश्वास विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनिल राऊत यांनी व्यक्त केला.

नुकतेच दत्ता दळवी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर राऊत यांनी टोला लागावत सेनेच्या कामगिरीवर भाष्य केले.

दरम्यान महाराष्ट्र दिनापासून दोन दिवस शिवतेज फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) आयोजित तिरंदाज व्हिलेज मनपा शाळा पवई हॉस्पिटल जवळ, आय आय टी मेनगेट पवई येथे शिव जागर या सांस्कृतिक कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ले छायाचित्र, शिवकालीन नाणी ’सुवर्ण होन‘ आणि ’शिवराई‘ ’शंभुराई‘ ही चलन प्रदर्शनात ठेवण्यात आली. तसेच स्वराज्यातील आरमारी जहाजांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील दुर्मीळ व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन या उत्सव सोहळ्यात प्रमुख आकर्षण आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पुरक असणाऱ्या बाळासाहेबांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे हे प्रदर्शन भरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन अमोर चव्हाण केले होते. तर डॉ. विजय तांदळेकर, प्रशांत आरोळकर हे संयोजक आहेत. शाखा १२२ चे शाखाप्रमुख सचिन मदने, विभाग अधिकारी युवासेना विजय कुरकुटे हे कार्यक्रमाचे सल्लागार होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात