महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : पाणीटंचाईच्या झळा – भाग १ : करोडो रुपये खर्चूनही पाणीटंचाई कायम

तालुक्यात आठ गावे व शंभर वाड्यांना पाण्याचा तीव्र तुटवडा

महाड : महाड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले तरीही समस्या तशीच कायम आहे. दर पाच वर्षांनी नव्या योजनांची घोषणांची भरपूर वारेमाप वचने दिली जातात, पण वास्तवात गावातील विहिरी कोरड्याच राहतात. ठोस उपाययोजना न करता केलेल्या कामांचा लाभ नागरिकांऐवजी ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींनाच होतो आहे.

एप्रिल महिना संपला असताना तालुक्यातील आठ गावे व सुमारे शंभर वाड्यांमधून पाण्यासाठी टँकर पुरवठ्याची मागणी झाली आहे.

महाड तालुका सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला असून येथील बहुतांश गावे दुर्गम डोंगराळ भागात आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीचा तडाखा आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई – अशा दुहेरी संकटांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

या तालुक्यात दरवर्षी सुमारे ३,००० मिमी पाऊस पडतो, मात्र भौगोलिक परिस्थितीमुळे अब्जो लिटर पाणी नद्या-नाल्यांमधून थेट समुद्रात वाहून जाते. या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

मार्चपासूनच पाण्याची तीव्र कमतरता जाणवू लागलेली असून एप्रिल अखेरपर्यंत २६ ग्रामपंचायतीतील आठ गावांतील सुमारे १०० वाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले आहे.

टँकर मुक्तीच्या गोंगाटात अनेक योजनांची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात टँकरद्वारेच पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक ठिकाणी योजना अपयशी ठरल्या असून देखील त्या गावांमध्ये टँकर पाठवले जात नाहीत. परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

खालील गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती विशेषतः गंभीर बनली आहे:
१) पिंपळकोंड
२) दाभोळ: खलाटी, खडपवाडी
३) वाकी बुद्रुक: आंब्याचा माळ, धनगरवाडी, आदिवासी वाडी, नारायणवाडी, नाणे माचिआवाड, नांदूरवाडी, पेढामकरवाडी, रोहिदास वाडी/बौद्ध वाडी, नाणेमाची, शेवते
४) पाचाड: पाचाड गाव, आरोग्य केंद्र परिसर, बौद्धवाडी, मोहल्ला, पाचाड नाका, बाउलवाडी
५) निगडे: उतेकर वाडी, रहाटवाडी, मधली वाडी, फणसेवाडी, मोरेवाडी, डोहवाडी, सावंतवाडी, खोतवाडी, जगतापवाडी, बौद्धवाडी
६) निजामपूर: हिरकणी वाडी
७) कुर्ले: बौद्धवाडी
८) मुमुर्शी: आंबेवाडी
९) मोहोत: कातिवडे, बोरगाव, वडघर, भिवघर/आदिवासी वाडी, पाटीलवाडी, बौद्धवाडी, आकटवाडी, सुतारवाडी
१०) टोळ बुद्रुक: गावठाण, आदिवासी वाडी, बौद्धवाडी
११) रावतळी: मानेधार
१२) करंजाडी: मस्के कोंड
१३) कावळे: धनगरवाडी
१४) ताम्हाणे: बौद्धवाडी, पवारवाडी, दळवीवाडी, मोरेवाडी, जोगळेवाडी, धुमाळवाडी, दाभेकरवाडी, कालकाईवाडी, बद्रिकेवाडी, मोहितेवाडी
१५) चोचिंदे: गवळवाडी
१६) आडी: बौद्धवाडी, दत्तवाडी, डोंगरोली
१७) वारंगी: गाढव खडकवाडी, मलईवाडी
१८) कुंभे शिवथर: सुनेभाऊ
१९) गोडाळे: शेडगे कोंड, झांजे कोंड, आदिवासी वाडी
२०) रेवतळे: फौजदार कोंड
२१) कुसगाव: कुसगाव खुर्द, वाणी कोंड, मोहल्ला, बौद्धवाडी, सडेवाडी, खरबाचा कोंड, गार पाटले, धनगरवाडी
२२) दासगाव: भोईवाडी, पाटील आळी, परीट आळी, गणेश नगर, आदिवासी वाडी, बौद्धवाडी, बामणे कोंड, न्हावी कोंड, वांद्रे कोंड, चर्मकार वाडी
२३) नातोंडी: जंगमवाडी, धारेची वाडी, चव्हाणवाडी
२४) तळीये: पुनर्वसन वाड्या – वरची, मधली, खालची वाड्या, सुतार कोंड, कुंभे नळी, शिंदेवाडी
२५) वीर: गावठाण, खरपवाडी, गणेश वाडी, दत्तवाडी, टेंभेवाडी, घोळेवाडी, भवानीवाडी
२६) भावे: चौधरी वाडी, भावे पठार, पिंपळदरी

(भाग २ मध्ये उपाययोजना, अपयशी योजनांचे विश्लेषण आणि नागरिकांच्या भावना…)

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात