ताज्या बातम्या महाराष्ट्र

फडणवीस यांच्या शिवाय गृहमंत्रालय कोण चालवतेय? – संजय राऊत

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणीतरी कोंडून ठेवले असून फडणवीस यांच्या शिवाय दुसरेच कुणीतरी गृहमंत्रालय चालवत आहे, अशी शंका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या धुमश्चक्रीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून यासाठीच खा. राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा ठाकरे गट (Shiv Sena Thackeray) आणि मुख्यमंत्री शिंदे गटांमध्ये मोठा राडा झाला होता. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना प्रचंड धक्काबुक्की करत घोषणाबाजी देखील केली. तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात हा गोंधळ चालू होता. याप्रकरणी दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिक असल्याचं ठाकरे गटातील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

यावर खा. राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिथे (शिवतीर्थ) जो काही संघर्ष झाला त्यानंतर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करत आहात. ही गृहमंत्रालयाची विकृती असून, गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर काय करायचे ते आम्ही बघू, असा इशारा देत, शिवतीर्थावर गद्दारांना फक्तं रोखण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. आता तुम्ही त्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करून तुमची विकृती उघड केली आहे. तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आमचा संघर्ष चालूच राहील, असाही गर्भित इशारा खा. राऊत यांनी दिला.

गद्दरांच्या विरोधात आमची लढाई न्यायलयात आणि रस्त्यावरही संघर्ष चालू राहील. बेईमान गटातील महिलांची भाषा आणि भूमिका पाहा, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली ते सांगा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाही? की त्यांना कोंडून ठेवून दुसरेच कोणीतरी राज्य करत आहे, असा सवाल करत खा. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात