अजितदादांच्या विश्वासू नेत्याचा पक्षातील नेत्यांनाच रोखठोक सवाल
मुंबई – “आम्हीही आमचं दैवत गमावलं असताना, दुर्दैवाने शरदचंद्र पवार गटाकडून (Sharad Pawar faction of NCP) या घटनेवर राजकारण केलं जात आहे,” असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (NCP Spokesperson Anand Paranjape) यांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्याच पक्षातील अजितदादांचे विश्वासू व ज्येष्ठ नेते यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, परांजपे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेतृत्वावर थेट सवाल उपस्थित केले आहेत.
या नेत्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले की, “जर खरंच २८ जानेवारी रोजी सकाळी अजितदादा (Ajit Pawar) मेघदूत या शासकीय निवासस्थानातून विमानतळावर जाण्यास निघाले होते, तर त्याचे सीसीटीव्ही फूटेज (CCTV footage of Ajit Pawar) तत्काळ गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे मागण्याची मागणी त्या वेळी का करण्यात आली नाही?”
या ज्येष्ठ नेत्याने पुढे बोलताना काही सडेतोड प्रश्न उपस्थित केले. “जर प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना अजितदादांबद्दल खरी श्रद्धा असती, तर त्यांनी त्या वेळी आपल्या पदांचे राजीनामे का दिले नाहीत? आता इतक्या दिवसांनंतर सीबीआय चौकशीची (demand of CBI probe) मागणी करण्याऐवजी, ही मागणी तातडीने मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे का करण्यात आली नाही?” असा सवाल त्यांनी केला.
या नेत्याने आरोप करताना म्हटले की, “आज जे बोलले जात आहे ते श्रद्धेपोटी नाही, तर राजकीय सोयीसाठी आहे. काही नेत्यांच्या कौटुंबिक व राजकीय गणितांमुळेच ही भूमिका घेतली जात आहे,” असा दावा त्यांनी केला. त्यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेते भविष्यात वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतात, अशी शक्यताही व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर, त्यांनी विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्या भूमिकेचा उल्लेख करत म्हटले की, “ते विरोधात असूनही या घटनेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान असलेला गुरू गमावला गेला, त्यांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा वेळी पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्या भूमिकेला नैतिक पाठिंबा देणे अपेक्षित होते,” असे मतही त्यांनी मांडले.
अखेर, या नेत्याने अजितदादांच्या पश्चात पक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नेतृत्वाला सावध राहण्याचा इशारा देत म्हटले की, “वेळीच कठोर निर्णय घेतले नाहीत, तर पुढील दिशा कोणती असेल हे सांगता येणार नाही.”

