महाराष्ट्र ताज्या बातम्या

”झारीतील शुक्राचार्यांना इशारा”; मुनगंटीवारांचा अर्थसंकल्पीय चर्चेत हल्लाबोल

मुंबई : “तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं…” या गाजलेल्या गीताच्या ओळी उद्धृत करत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत आपल्या भावना व्यक्त करत सरकारवर टीका केली. “विदर्भातील काही जिल्ह्यांवर अधिकारी जाणूनबुजून अन्याय करत आहेत. हे ‘झारीतील शुक्राचार्य’ विकासाची गंगा आमच्या भागात पोहोचू देत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.

मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देत “एका शुक्राचार्याला डोळा गमवावा लागला होता, आम्ही विदर्भाचे आहोत, हे लक्षात ठेवा,” असे सणसणीत शब्दांत सूचित केले.

“काही अधिकारी उत्कृष्ट काम करतात, त्यांची टीम तयार करा, पण ‘चमको’ अधिकाऱ्यांना पायबंद घाला,” अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली.

ते पुढे म्हणाले, “आम्ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण करत नाही, तर राज्याच्या संसाधनांचा न्याय्य उपयोग व्हावा, ही आमची भावना आहे. काटकसर आणि आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे, पण ज्या जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न कमी आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये. आमच्या विभागाकडेही लक्ष द्या,” असा आग्रह त्यांनी धरला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात