महाराष्ट्र ताज्या बातम्या

’लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार मौन; विधानसभेत गदारोळ, विरोधकांचा सभात्याग

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांना दरमहा ₹2,100 देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीबाबत सरकारचे उत्तर समाधानकारक नसल्याने विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. संतप्त विरोधी सदस्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सरकारला हा प्रश्न विचारला होता. सध्या मिळणारे ₹1,500 कधी वाढवून ₹2,100 केले जातील? यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उत्तर देत होत्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली.

मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देताना “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील,” असे सांगितले. मात्र, या उत्तराने संतप्त झालेल्या विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

या प्रश्नावर 34 आमदारांनी सरकारला जाब विचारला होता. परंतु, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी “मंत्री महोदयांनी समाधानकारक उत्तर दिले आहे,” असे सांगून पुढील चर्चेस नकार दिला. यामुळे संतप्त विरोधकांनी “धिक्कार” घोषणा देत सभात्याग केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात