महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील 517 रखडलेल्या SRA प्रकल्पांपैकी 273 विकासकांना हटवले; अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा

मुंबई : सायन कोळिवाडा आणि मुंबईतील अन्य रखडलेल्या 517 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपैकी 273 विकासकांना काम न सुरू केल्यामुळे हटवण्यात आले आहे. जे विकासक ठरलेल्या कालमर्यादेत प्रकल्पाचे काम सुरू करत नाहीत, त्यांना अंतिम नोटीस दिली जाईल. तरीही जबाबदारी पार पाडली नाही, तर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री शंभुराजे देसाई यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

लक्षवेधी सूचना उपस्थित करताना कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांनी सायन कोळिवाड्यासह अनेक SRA प्रकल्प 15 वर्षांपासून अपूर्ण असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. “विकासकांना एलओआय (LOI) मिळूनही काम सुरू होत नाही. झोपडीधारकांना भाडे मिळत नाही. अधिकारी विकासकांच्या बाजूने भूमिका घेतात. मूळ मालकांना कोर्टकचेरीत अडकवले जाते, पात्रतेसाठी तीन-चार लाख रुपयांची मागणी केली जाते,” असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनीही विकासकांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या मतदारसंघातील 20 वर्षांपासून रखडलेल्या SRA प्रकल्पांची उदाहरणे देत, “SRA विभागात आठ-आठ वर्षे बसलेले भ्रष्ट अधिकारी का बदलले जात नाहीत? नियमानुसार तीन वर्षांत बदल्या का होत नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, त्यांनी या अधिकाऱ्यांची यादी लवकरच सादर करणार असल्याचे जाहीर केले.

मंत्री शंभुराजे देसाई यांनी सर्व नावे सांगितलेल्या अधिकाऱ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासला जाईल, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे विधानसभेत स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात