महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड जिल्ह्यात ५० वर्षांपासून पाणीटंचाई – आमदार रवीशेठ पाटील यांचा आक्रमक सवाल

मुंबई – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील १६० वाड्या आणि ३६ गावे गेल्या ५० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याला वंचित आहेत. या भागांना पाणी मिळण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील? असा रोखठोक आणि आक्रमक सवाल पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना उपस्थित केला.

यावर उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन हा प्रश्न जागेवरच सोडवू, असे आश्वासन दिले.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले की, रायगड जिल्हा परिषदेमार्फत जल जीवन मिशन योजनेंतर्गत ३८ गावे आणि १०८ वाड्यांसाठी ५२०० वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यासाठी १९९.७८ लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. १०० किमी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, आणखी ५० किमीचे काम बाकी आहे.

रवीशेठ पाटील यांनी या भागांसाठी पाणीपुरवठा आराखडा तयार असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप केला. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याने हा प्रश्न सुटणार नाही, शासनाने तातडीने तो सोडवावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती.

या भागातील जुन्या पाइपलाइन सतत फुटत आहेत, जल जीवन मिशन योजनेतही पुरेसे पाणी उपलब्ध नाही, लोकांना जे पाणी मिळते ते दूषित असते, असे मुद्दे उपस्थित करून आमदार पाटील यांनी सरकारला जाब विचारला.

यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकाच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात