महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘पोक्सो’गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा : उपसभापती नीलम गोर्‍हे 

X : @therajkaran

नागपूर 

अल्पवयीन युवती अत्याचार आणि ‘पोक्सो’सारख्या (POCSO act) गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा अन् या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Dr Neelam Gorhe) यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तर तासात दिले. 

या संदर्भात ‘तात्काळ कार्यवाही केली जाईल’, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यासंदर्भात प्रश्‍न विचारला होता. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केल्याची घटना जून-जुलै २०१३ मध्ये घडली. या प्रकरणी अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. यात आटपाडी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपींना पाठिशी घालत आहेत. त्या संदर्भात शासन काय कारवाई करणार आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. 

उत्तर देतांना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘सदर प्रकरणात गुन्हा नोंद केला तसेच सात दिवसांत आरोपपत्र दाखल केले आहे. तपासात काही तांत्रिक अडचणी आहेत. या प्रकरणी पिडितेच्या नातेवाइकांना मारहाण झाली, तक्रार घेण्यास टाळटाळ केली गेल्याची तक्रार असेल, तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.’’

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात