ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मेरे साथ अन्याय हुआ, मुझे फसाया गया’, मॉरिसचा अंगरक्षक ओरडत कोर्टाबाहेर पडला; 13 फेब्रुवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

मुंबई
मिलिंद माने

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमरेंद्र मिश्रा नामक मॉरिसच्या बॉडीगार्डला न्यायालयाने 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मुंबईतील न्यायालयामध्ये आज झालेल्या सुनावणीनंतर मिश्राने आपल्याला अभिषेक घोसाळकर प्रकरणात नाहक अडकवण्यात आल्याचा आरोप केला. न्यायालयामधून बाहेर पडताना अक्षरशः अमरेंद्र मिश्रा ओरडतच बाहेर पडला.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा नामक गुंडाने फेसबुक लाइव्हदरम्यान निघृण हत्या केली. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. मॉरिसने अमरेंद्र मिश्रा या आपल्या अंगरक्षकाच्या पिस्तुलातून अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला होता. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या मुसक्या आवळल्या. अमरेंद्र मिश्रा याची सध्या मुंबई गुन्हे विभागाकडून कसून चौकशी सुरू आहे.

अभिषेक घोसाळकर प्रकरणातील संशयित आरोपी अमरेंद्र मिश्रा याला शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर अमरेंद्र मिश्रा अक्षरशः ओरडत कोर्टाबाहेर पडला.

मुझे फसाया गया है
कोर्टाबाहेर पडताना अमरेंद्र मिश्राने पत्रकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला थेट गाडीत नेऊन बसवले. हे पाहून तो ओरडत म्हणाला की, ‘मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ गलत हुआ है. मुझे फसाया गया है’. त्यानंतर पोलिसांनी गाडी पुढे नेत त्याला शांत बसवले. शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमरेंद्र मिश्रा याच्या या दाव्यानंतर आता अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मिश्राने आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा आरोप केल्यामुळे याविषयीही वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात