महाराष्ट्र ताज्या बातम्या

UIDAI, NHRC आणि TISS यांच्या संयुक्त उपक्रमातून आधार सेवा नागरिकांच्या दारात

Citizens attending UIDAI Aadhaar outreach camp in Mahape Navi Mumbai

महापे आणि बेलापूरमध्ये विशेष आधार शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: Unique Identification Authority of India (UIDAI) अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांच्या वतीने महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार समुदाय पोहोच शिबिरांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि Tata Institute of Social Sciences (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे रोजी ही शिबिरे पार पडली.

स्थानिक तसेच वंचित घटकांपर्यंत आधार सेवा सुलभपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर पालकांनी उपस्थिती लावली.

शिबिरांमध्ये नवीन आधार नोंदणी, नाव-पत्ता-जन्मतारीख यांसारख्या डेमोग्राफिक माहितीचे अद्ययावतीकरण, मोबाईल नंबर लिंकिंग, तसेच बायोमेट्रिक अपडेट अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. UIDAI च्या सुरक्षा आणि गोपनीयता नियमांचे पालन करून सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

अनेक बालकांनी प्रथमच आधार नोंदणी आणि अनिवार्य बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या परिसरातच आधार सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल UIDAI, NHRC आणि TISS यांच्या टीमचे आभार मानले.

डिजिटल समावेशन आणि नागरिकसुलभ सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे समुदाय-आधारित उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे UIDAI कडून स्पष्ट करण्यात आले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात