महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोहने-टिटवाळा परिसराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – माजी आमदार नरेंद्र पवार

कल्याण : मोहने आणि टिटवाळा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे अभिवचन भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे माजी राज्यसभा खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या खासदार निधीतून गाळेगाव परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

नरेंद्र पवार यांनी सांगितले की, कल्याण विधानसभा मतदारसंघ आणि परिसरात अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प वेगाने सुरू आहेत. काही कामे केंद्र सरकारच्या अखत्यारीत तर काही राज्य सरकारमार्फत होत आहेत, त्यामुळे कल्याण आणि आसपासचा परिसर वाहतूक आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत आहे.

“मुंबईतून महाराष्ट्रातील तसेच देशातील कोणत्याही भागात जाण्यासाठी आवश्यक असणारी रस्ते कनेक्टिव्हिटी कल्याणच्या आसपास उभी राहत आहे. भविष्यात हा परिसर ‘तिसरी मुंबई’ म्हणून नावारूपाला येईल आणि त्यात मोहने-टिटवाळा परिसराचा मोठा वाटा असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेचे माजी खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या खासदार निधीतून गाळेगाव परिसरात अंतर्गत रस्ते आणि झाकणासह गटार बांधकाम यांसारख्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपा मोहने-टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी नगरसेवक जनार्दन पाटील, अनंता पाटील, अपर्णा पाटील, संतोष शिंगोळे, रमेश कोनकर, मोहन कोनकर, सतिश पाटील, भूषण मिश्रा, मुकेशकुमार कनोजिया, विजय पाटील, रामा पाटील, रंजना भामरे, सुरज सुतार तसेच गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवा बांधव आणि भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात