ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात अंबादास दानवे ऑक्सिजन मास्क घालून विधीमंडळात

नागपूर

राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले. जनतेचं आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचे स्टेथोस्कोप घेऊन तपासणी करणार, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला चिमटा काढला.

गळ्यात स्टेथोस्कोप व तोंडाला ऑक्सिजन मास्क
मंत्री खात तुपाशी, रुग्ण मरतायत उपाशी, रुग्णांना नाही औषध गोळी, आरोग्यव्यवस्थेची झाली होळी अशा घोषणा देत विरोधी पक्षनेत्यांनी विधीमंडळ परिसर दणाणून सोडला. राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यात नागपूर, नांदेड, संभाजी नगर, कळवा या ठिकाणी औषधाविना मोठया प्रमाणात मृत्यू झाले.

तरी सरकारने औषधं खरेदी केले नाही. राज्याची आरोग्य व्यवस्था गॅस वर आहे. सरकार जनतेचं आरोग्य राखू शकत नाही, जीव वाचवू शकत नाही की रुग्णांना ५ रुपयांची गोळी देऊ शकत नाही. याला सर्वस्वी सरकार, आरोग्यविभाग जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

विविध मुद्द्यांवरुन सरकारची कोंडी
गेल्या चार दिवसांपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अंबादास दानवे राज्यातील विविध विषयांवर सवाल उपस्थित करीत आहेत. राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेबरोबरच कांद्यावरील निर्यात बंदी याशिवाय अवकाळीच्या मुद्द्यावरुनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. राज्यात शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागत आहे. अशा परिस्थितीत अद्यापही पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. यामुद्द्यावरील त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात