महाराष्ट्र ताज्या बातम्या

भावूक झाले भाजप खासदार नारायण राणे, समाजासाठी काही देऊन जाण्याची व्यक्त केली भावना

मुंबई : एकेकाळी महाराष्ट्रातील आक्रमक विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेतील दमदार नेते, तर आजचे भाजप खासदार नारायण राणे हे पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “काळ बदलला, राजकारण बदलले, मी आज आहे, उद्या असेन नसेन, पण समाजासाठी काहीतरी देऊन जावे, कारण समाज आणि इतिहास हे पाहत असतात,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आज प्रदेश भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नेहमीच्या आक्रमक आणि परखड शैलीतील राणेंच्या संवेदनशील आणि भावूक रूपाचे दर्शन घडले. “मी पंचावन्न पदे निर्माण केली, अकरा पदांवर काम केले आणि प्रत्येक पदाला न्याय दिला,” असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री असताना दाऊदशी बोलणाऱ्या ३७ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

महाराष्ट्र आणि राजकारण याबाबत बोलताना पत्रकारितेतही बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. “हा पेशा पवित्र आहे, त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. बातमी देताना शब्दांत फेरफार नसावा. प्रत्येकालाही एक संसार आणि कुटुंब असते, हे विसरू नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.

प्रश्नोत्तर सत्रात दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करताना ते अधिक भावूक झाले. “दिशाच्या जागी कोणाचीही बहिण किंवा मुलगी असू शकली असती. दोषींवर एफआयआर दाखल करा, अटक करा. तिच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा. पोलिसांनी सत्य लपवू नये, कारण परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा,” असा ठाम आग्रह त्यांनी धरला.

भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत, असे सांगतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राजकारण समजून घ्यावे आणि फार बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात