महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ‘चला मुंबई’ आंदोलन!

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकविमा, भावफरक, अनुदाने, आणि अन्य मागण्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली ‘चला मुंबई’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

१९ मार्च २०२५ रोजी, मुंबईतील अरबी समुद्रातील नरिमन पॉईंट येथे हजारो शेतकरी आपली मागणी मांडण्यासाठी एकत्र येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या : शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी, पिकविमा योजनेच्या अनियमिततेवर तोडगा, सोयाबीन-कापूस यांना रास्त भाव मिळावा, जंगल जनावरांच्या त्रासावर कायमस्वरूपी उपाय, साखर कारखान्यांचे थकलेले एफआरपी देयके मिळावीत आणि दूध आणि धान्याला हमीभाव मिळावा

मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या तयारीसाठी मुक्काम ठिकाण: १८ मार्च रोजी मुक्काम: श्री क्षेत्र पंचायतन मंदिर, जे. एम. म्हात्रे इंग्लिश मिडियम स्कूल जवळ, जुना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे, गाव – नढळ, खालापूर, पनवेल – ४१०२०६

अधिक माहितीसाठी राजीव कसबे – 7385678999 आणि सचिन पांडुळे – 9096313022 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा हा लढा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ‘चला मुंबई’ आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात