महाराष्ट्र ताज्या बातम्या

गोतस्करी आणि गोहत्या प्रकरणात मकोका लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई – वारंवार गोहत्या आणि गोतस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

विधायक संग्राम जगताप यांनी अहिल्यनगर (जि. श्रीगोंदा) येथील ससाणेनगर भागात घडलेल्या वाद, मारहाण आणि त्यातून झालेल्या मृत्यूप्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली. या घटनेत फटाके वाजवण्यावरून मातंग समाजातील ससाणे आणि इतर ११ जणांना मारहाण झाली, त्यानंतर ससाणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी सव्वा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला, तसेच कुरेशी कुटुंबाच्या गुन्हेगारी वर्चस्वाची दहशत आहे, असा आरोप जगताप यांनी केला.

जगताप यांनी विधानसभेत मांडलेल्या माहितीनुसार, कुरेशी गँगवर १८ ते २० गुन्हे दाखल असून, त्यांचा जिल्ह्यात गोतस्करी आणि गोहत्येचा मोठा व्यवसाय आहे. तसेच, स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे कारवाई उशिरा झाली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यासोबतच, गोहत्या आणि गोतस्करी विरोधात कठोर कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सांगितले की, या प्रकरणात कुणीही गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः गुन्हा नोंदवला. तसेच, एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गोतस्करीच्या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेच्या उत्तरात स्पष्ट केले की, वारंवार गोहत्या आणि गोतस्करीचे गुन्हे करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात