महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणावरून चित्रा वाघ – रोहिणी खडसे यांच्यात सोशल मीडियावर खडाजंगी!

मुंबई – विधानपरिषदेत गुरुवारी गाजलेले दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून वादळ आज थंड होईल असे वाटत असतानाच, शुक्रवारी सोशल मीडियावर नव्या खडाजंगीला तोंड फुटले. फरक इतकाच की, पात्र बदलली!

गुरुवारी सभागृहात ठाकरे गटाचे नेते आ. अनिल परब होते, तर आज सोशल मीडियावर भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. दोघींनीही “नम्रपणे”(?), पण ठसकेबाज शैलीत एकमेकांवर जोरदार टोलेबाजी केली.

रोहिणी खडसेचा टोला – “बाईईईई, हे बिग बॉस नाही हं!”
सकाळीच रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांचा कालचा व्हिडीओ शेअर करत टोला लगावला, “बाईईईईई काय हा प्रकार! थोडं थोडं साम्यच आहे, नाही! पण कोणीतरी सांगा की आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे… बिग बॉसचा एखादा सीझन नाही हं!”

त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला, “चित्रा वाघ यांचे भाषण पाहून बिग बॉस आठवला… जितकी एकमेकांची उणी-धुणी काढाल, तितकाच बिग बॉस खूश होतो. अगदी तसंच, चित्रा वाघ यांनी हे वक्तव्य कोणाला तरी खूश करण्यासाठी केलं का?”

चित्रा वाघ यांनीही सडेतोड प्रत्युत्तर देत रोहिणी खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला,
“रोहिणी खडसे यांचे वडील विधान परिषदेत माझ्या समोर बसतात, त्यांनी त्यांना विचारावे, ते जास्त चांगलं सांगतील!”

त्यांचा इशारा स्पष्ट होता – “मी शिकारीच्या तयारीत आहे, जास्त डोळ्याला डोळा भिडवू नकोस, नाहीतर जागेवरच फडशा पडेल!”

शेवटी रोहिणी खडसेनी घेतली सपशेल माघार. चित्रा वाघ यांच्या या प्रत्युत्तरानंतर रोहिणी खडसे यांना जाणवले की आपण चुकीच्या वादात अडकतोय. पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्यानंतर त्यांनी गप्प राहणेच योग्य समजले.

वाचकहो, हा वाद संपला असला तरी सोशल मीडियावर अजून किती वेळ टिकणार हे पाहणे रंजक ठरेल!

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात