महाराष्ट्र ताज्या बातम्या

किल्ले रायगडावरील शिव समाधीच्या अष्टकोनी चौथर्‍यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी – गड संवर्धन समितीची मागणी

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील शिवसमाधीच्या अष्टकोनी चौथर्‍यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी जोरदार मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.

रायगडावर दररोज लाखो शिवभक्त आणि पर्यटक भेट देतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे नेतेसुद्धा या ऐतिहासिक स्थळाला भेट देतात. मात्र, काही वेळा अनावधानाने किंवा अतिउत्साहाने हे मान्यवर थेट समाधीच्या अष्टकोनी चौथर्‍यावर चढून अभिवादन करतात, जे अत्यंत निंदनीय आणि समाधीच्या पावनतेचा अवमान करणारे आहे. अशा घटनांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही वारंवार दिसून आले आहेत.

शिवसमाधी हे केंद्र सरकारचे संरक्षित स्मारक असून त्यास विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे चौथर्‍यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी लेखी मागणी प्रसाद दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना केली आहे.

त्यांनी यासोबतच पुढील उपाययोजनांचीही मागणी केली आहे: चौथऱ्याभोवती संरक्षित रेलिंग लावणे, चौथऱ्यावर फक्त साफसफाईसाठी नियमबद्ध परवानगी देणे, साफसफाईदरम्यान छायाचित्रणास सक्त मनाई करणे, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची तरतूद करणे

या मागण्यांमुळे रायगडावरील शिवसमाधीचे पावित्र्य जपले जाईल आणि भविष्यात कोणताही अवमान होण्याची शक्यता दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात