महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर ते सिंधुदुर्गचा किनारपट्टा अदानी-अंबानीसाठी? – हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात

पालघर/मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडक्या उद्योगपतींसाठी रेड कार्पेट टाकत आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील धारावी, नवी मुंबई विमानतळ, आणि आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा सागरी पट्टा अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.

शक्तीपीठ मार्ग अदानी-अंबानींच्या फायद्यासाठीच

पालघर येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता, आवश्यकता नसतानाही भाजपा सरकार नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग रेटत आहे. यामागे अदानी-अंबानी यांना सहज व्यापार करता यावा हा हेतू आहे. गोव्यातील कोळसा, खनिजे आणि कोकणात सापडलेल्या मौल्यवान खनिज संपत्तीवर अदानी-अंबानीचा कब्जा मिळावा म्हणूनच हा मार्ग उभारला जात आहे.”

कोकणी माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
• कोकणातील जनता एकजूट राहते, त्यांना विभागण्यासाठी काही मंत्री समाजात तेढ निर्माण करत आहेत.
• सिंधुदुर्गप्रमाणेच पालघरमध्येही जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव आखला जात आहे.
• हा आदिवासी भाग असूनही त्यांना दिलेल्या संरक्षण नियमांची पायमल्ली केली जात आहे.

राज्यातील बिघडलेली परिस्थितीला भाजपा सरकार जबाबदार

हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, “२०१४ पासून भाजपाची सत्ता असूनही राज्यात परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी शिखरावर आहे, आणि कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.”

गुन्हेगारी वाढली, राज्य गँगवर्चस्वाखाली
• महिला अत्याचार वाढले, गुन्हेगारी टोळ्यांचा उदय झाला.
• रेती माफिया, कोयता गँग, आका गँग, खोक्या गँग उच्छाद मांडत आहेत.
• सत्ताधारी पक्षाच्या गुंडांकडून खंडणी वसुली सुरू आहे.

ट्रिपल इंजिन सरकार राज्यासाठी विशेष पॅकेज का आणू शकत नाही?
• राज्यात मोठी महसुली तूट असून सरकारकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत.
• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान सतत परस्परांचे गुणगान गातात, पण दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणण्याची धमक नाही.”

“आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढेल”
• विधानसभेत आघाडी असल्याने काँग्रेसला पालघरमध्ये उमेदवार देता आला नाही.
• मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, मनिष गणोरे, यशवंत सिंग, विजय पाटील, पराग पाष्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्हा दौऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात