महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिशा सालियन मृत्यू प्रकरण विधानसभेत गाजले – भाजपने केली आरोपींना अटकेची मागणी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला असून, या प्रकरणी ते न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणात महाविकास आघाडीतील एका प्रभावशाली मंत्र्याचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला.

विशेष पोलीस पथकाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात

भाजप आमदार अमित साटम यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत विधानसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली.
ते म्हणाले, “दिसंबर २०२२ मध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात आले होते. मात्र, पावणेपाच वर्षे उलटूनही या पथकाचा अहवाल समोर आलेला नाही. मुंबईच्या तत्कालीन महापौरांनी दिशा सालियनच्या कुटुंबियांवर दबाव टाकला होता. तिच्या वडिलांनी चार मित्र, एक मंत्री आणि तत्कालीन महापौरांची नावे घेतली असून, या सर्वांची विशेष पथकाद्वारे चौकशी व्हावी.”

सभागृहात गदारोळ, कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

साटम यांच्या मागणीनंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी अध्यक्षांच्या समोर येत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

गंभीर प्रकरण, आरोपींना अटक करावी” – नीतेश राणे

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणांमध्ये तातडीने चौकशी करून आरोपींना अटक करणे आवश्यक आहे.”

कायदा सर्वांसाठी समान, कठोर कारवाई करू” – गृह राज्यमंत्री योगेश कदम

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने सरकारला पक्षकार केले आहे.

ते म्हणाले, “या प्रकरणात कोणताही राजकीय पक्ष असला तरी कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल. सरकारही न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करेल.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात