महाराष्ट्र ताज्या बातम्या

बिबट्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी–अधिकारी संयुक्त बैठक; मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले : वनमंत्री गणेश नाईक

नागपूर: राज्यातील मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी सरकार गंभीर असून, भविष्यात एकही मनुष्य बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडू नये यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ज्या विभागात बिबट्यांचा त्रास वाढला आहे, तेथे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पिंजरे देण्यात येतील. डॉ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, सुनील प्रभू यांनी ही सूचना मांडली होती.

नाईक यांनी सांगितले की पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढली असून, सध्या बिबट्या शेड्यूल–I मध्ये असल्याने कारवाईत मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्याला शेड्यूल–I मधून शेड्यूल–II मध्ये वर्गीकृत करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. केंद्राने राज्यातील ५ बिबट्यांच्या नसबंदीला मंजुरी दिली असून, कार्यवाही सुरू झाली आहे. सहा महिन्यांनंतर अहवाल आल्यानंतर आणखी बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बचाव केंद्रे, पिंजरे आणि AI-आधारित यंत्रणा

  • जुन्नर (पुणे) येथे सुरू असलेल्या बिबट्या बचाव केंद्राची क्षमता वाढवण्याचे निर्देश, अहिल्यानगरमध्ये नव्या बचाव केंद्राला मंजुरी, पुणे जिल्ह्यात १,२०० पिंजरे, तर नाशिक–अहिल्यानगरमध्येही मोठ्या प्रमाणात पिंजरे उपलब्ध, मागणी आल्यानंतर तातडीने अतिरिक्त पिंजरे उपलब्ध करण्याचे आदेश

बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मॉनिटरिंग यंत्रणा उभारली असून, संवेदनशील भागातील शाळांची वेळही बदलण्यात आली आहे.

बिबट्या वावर असलेल्या भागांत गस्तीसाठी गृह, वन आणि महसूल विभागाची संयुक्त पथके तयार केली जात आहेत. स्थानिक तरुणांना यामध्ये सहभागी करण्याचा विचारही सुरू आहे.

जंगलाच्या सीमेवर बांबूचे कुंपण उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, जे वन्यजीवांना गावात येण्यापासून रोखण्यास मदत करणार आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात