महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दहशतवादी हल्ल्याचा खोटा ठरवण्याचा प्रयत्न: आमदार चित्रा वाघ

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपले कुटुंब गमावलेल्यांबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते खोटं बोलत आहेत, असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी केला आहे.

आमदार वाघ म्हणाल्या, “पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांना आपले पती, भाऊ, आणि बाप गमवावे लागले आहेत. त्यांचं दुःख संपूर्ण देश आणि जगाला वाटतंय. पण, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारत आहेत आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याचा क्रूर प्रयत्न करत आहेत.”

आमदार वाघ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत म्हटलं, “दहशतवाद्यांना पाठीशी घालून काय साध्य करायचं आहे, हे जनतेला चांगलं समजलं आहे. राहुल गांधींपासून ते वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय?”

आणि त्यांनी पुढे म्हणालं, “जनतेला हे लक्षात ठेवा, तुमचं हे धोरण कुठेतरी तुमच्यावरच उलटणार आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात